
शिवसेना पक्षातील ६ खासदार फुटणार असल्याच्या चर्चेवर शिक्कामोर्तब झालं आहे. संजय जाधव, संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर,भाऊसाहेब वाकचौरे आणि ओमराजे निंबाळकर यांचा समावेश आहे. ठाकरेंनी ६०व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत ठेवलेल्या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.
ओमराजे निंबाळकर यांचा हिशोब चुकता करणार असल्याची भावना यावेळी सांगलीवरून आलेल्या तालुकाप्रमुखानं व्यक्त केली. २०२९ला हे खासदार साधे ग्रामपंचायत लढायचे लायकीचे राहणार नाहीत, त्यांच्या विरोधात घरोघरी जाऊन प्रचार करणार आहे. ओमराजे यांचा प्रचार करायला सांगलीवरून धाराशिवला गेलो होतो. आता त्यांचा हिशोब चुकता करणार असं एका कार्यकर्त्याने म्हटलं आहे.
ठाकरे कुटुंब हे नेते तयार करायची फॅक्टरी असल्याचं यावेळी कार्यकर्त्यानी म्हटलं आहे. शिवसेनेवर संकट आली तरी घाबरत नाही. काँग्रेसमधून आलेल्या व्यक्तीला खासदार केलं, मुलीला नगरसेवक केलं. आम्ही राजीनामा मागतोय.
आम्ही या गद्दारांचा राजीनामा मागतोय असं यावेळी शिवसैनिकांनी म्हटलं आहे. ठाकरे कधी संपत नसतात. ठाकरे हि नेते तयार करण्याची कंपनी असल्याचं मत यावेळी इथं उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलं आहे. आज उद्धव ठाकरे काय बोलतात याकडं सर्वांचं लक्ष लागून राहील आहे.