12th class Exam Form: पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक निर्णय, बारावीच्या अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ जाहीर

Published : Sep 29, 2025, 07:34 PM IST

12th class Exam Form: राज्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी, राज्य सरकारने बारावी परीक्षेचा अर्ज भरण्याची मुदत २० ऑक्टोबर २०२५ पर्यंत वाढवली आहे.

PREV
15
अतिवृष्टी आणि पुरामुळे जनजीवन विस्कळीत

मुंबई: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये, विशेषतः मराठवाड्यात गेल्या काही आठवड्यांत आलेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतजमिनी, घरे, जनावरे आणि संसारोपयोगी वस्तूंप्रमाणेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्यदेखील या नैसर्गिक आपत्तीत वाहून गेले. वह्या, पुस्तके, दप्तरं शिक्षणाचा आधार असणाऱ्या या वस्तूंचा मोठा नुकसानी झाला.

या पार्श्वभूमीवर, पुरामुळे बारावीच्या अर्ज भरण्यात अडचणीत सापडलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा देत राज्य सरकारने अर्ज भरण्याची अंतिम तारीख वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत, आता विद्यार्थ्यांना २० ऑक्टोबर २०२५ पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. 

25
हजारो विद्यार्थ्यांची होती मागणी

यावर्षी बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख २९ सप्टेंबर होती. मात्र पुरामुळे हजारो विद्यार्थ्यांना अद्याप अर्ज भरता आले नव्हते. एका दिवसात इतक्या मोठ्या संख्येने अर्ज प्रक्रिया पूर्ण होणे अशक्य असल्याने विद्यार्थ्यांसह पालकांकडून मुदतवाढीची मागणी होत होती. 

35
उपमुख्यमंत्र्यांची तत्काळ प्रतिक्रिया

या मागणीकडे तात्काळ लक्ष देत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुदतवाढीची घोषणा केली. त्यांनी शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांना यासंदर्भात त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. भुसे यांनी राज्य परीक्षा मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांच्याशी संपर्क साधून निर्णय अंमलात आणण्यास सुरुवात केली. 

45
अर्ज भरण्यासाठी नवीन सुधारित मुदती

नियमित विद्यार्थ्यांसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख: २० ऑक्टोबर २०२५

बाह्य विद्यार्थ्यांसाठी (External) अर्ज भरण्याची अंतिम तारीख: १५ ऑक्टोबर २०२५

नवीन परीक्षा केंद्रासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख: १० ऑक्टोबर २०२५ 

55
व्यापक नुकसान, शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न

मराठवाड्यासह राज्यातील सुमारे २० जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे फक्त शेतीच नव्हे, तर गावातील छोट्या व्यावसायिक, शेतमजूर, कारागीर, बारा बलुतेदार वर्ग आणि मागासवर्गीय समाज यांच्यावरही मोठे संकट ओढवले आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून हा निर्णय शिक्षण मंत्रालयाने घेतलेला आहे.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories