मुंबई: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये, विशेषतः मराठवाड्यात गेल्या काही आठवड्यांत आलेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतजमिनी, घरे, जनावरे आणि संसारोपयोगी वस्तूंप्रमाणेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्यदेखील या नैसर्गिक आपत्तीत वाहून गेले. वह्या, पुस्तके, दप्तरं शिक्षणाचा आधार असणाऱ्या या वस्तूंचा मोठा नुकसानी झाला.
या पार्श्वभूमीवर, पुरामुळे बारावीच्या अर्ज भरण्यात अडचणीत सापडलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा देत राज्य सरकारने अर्ज भरण्याची अंतिम तारीख वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत, आता विद्यार्थ्यांना २० ऑक्टोबर २०२५ पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत.