अंघोळीच्या वेळी केस गळणे सामान्य आहे, पण योग्य काळजी घेतल्यास ते कमी होऊ शकते. गरम पाणी, तीव्र शॅम्पू वापरणे आणि ओल्या केसांमध्ये जोराने विंचरणे टाळा. सौम्य किंवा आयुर्वेदिक शॅम्पू वापरा, अंघोळीपूर्वी केसांना तेल लावा आणि प्रथिनेयुक्त आहार घ्या.
अंघोळ करताना केस गळती होत असल्यास त्यामागे अनेक कारणं असू शकतात – गरम पाणी, चुकीचे शॅम्पू, आहारातील कमतरता, किंवा स्काल्पची निगा न राखणं. खाली काही उपयोगी टिप्स दिल्या आहेत.
26
गरम नव्हे तर कोमट पाणी वापरा
खूप गरम पाणी केसांची मुळे कमकुवत करतं. त्यामुळे केस कोरडे, निस्तेज होतात आणि गळायला लागतात.
36
सौम्य किंवा हर्बल शॅम्पू वापरा
सल्फेट आणि पाराबेनयुक्त शॅम्पू केसांना नुकसान पोहोचवतात. नैसर्गिक घटक असलेला शॅम्पू वापरणं योग्य.