Travel : प्रवासादरम्यान फ्लाइट उशिरा होणे किंवा अचानक रद्द होणे ही प्रवाशांसाठी मोठी डोकेदुखी ठरते. अशा वेळी अनेक एअरलाइन्स प्रवाशांना हॉटेल सुविधा, अन्न किंवा रिफंड देण्यास टाळाटाळ करतात.
भारतीय नागरी उड्डाण महासंचालनालयाने (DGCA) प्रवाशांसाठी काही ठराविक नियम निश्चित केले आहेत. फ्लाइट तीन तासांपेक्षा जास्त उशिरा झाल्यास किंवा रद्द झाल्यास प्रवाशाला एअरलाइन्सकडून पर्यायी फ्लाइट, अन्न, हॉटेल व्यवस्था किंवा रिफंड मिळण्याचा हक्क आहे. जर प्रवासी दुसऱ्या फ्लाइटची वाट पाहत असेल, तर एअरलाइन्सने आवश्यक सुविधा पुरवणे बंधनकारक आहे. मात्र, हवामानातील बदल किंवा नैसर्गिक कारणांमुळे उड्डाण रद्द झाल्यास परिस्थितीनुसार सवलत लागू होते.
24
AirSewa App — प्रवाशांचा सरकारी सहाय्यक
भारत सरकारच्या नागरी उड्डाण मंत्रालयाने सुरू केलेले AirSewa Portal आणि Mobile App हे प्रवाशांच्या तक्रारींसाठी अधिकृत व्यासपीठ आहे. या अॅपवर प्रवासी फ्लाइट उशिरा होणे, रद्द होणे, सामान हरवणे, वाईट सेवा, कर्मचारी वर्तन, रिफंड न मिळणे अशा अनेक समस्यांबाबत तक्रार नोंदवू शकतात.
AirSewa App हे Android आणि iOS दोन्हीवर उपलब्ध आहे.
अॅप डाउनलोड करून प्रवासी आपली माहिती, फ्लाइट क्रमांक आणि तक्रारीचे तपशील भरू शकतो.
एकदा तक्रार नोंदवल्यानंतर त्याला Complaint ID मिळते, ज्याद्वारे तो आपली तक्रार ट्रॅक करू शकतो. सरकार ही तक्रार संबंधित एअरलाइन्स किंवा विमानतळ प्राधिकरणाकडे पाठवते आणि ठराविक वेळेत उत्तर देणे बंधनकारक असते.
34
हॉटेल आणि रिफंडबाबत प्रवाशांचे हक्क
फ्लाइट तांत्रिक बिघाडामुळे किंवा एअरलाइन्सच्या चुकांमुळे उशिरा झाली, तर प्रवाशाला हॉटेलमध्ये राहण्याची व भोजनाची सोय फुकटात देणे एअरलाइन्सची जबाबदारी असते. जर प्रवाशाला दुसऱ्या फ्लाइटचा पर्याय दिला गेला नाही, तर त्याला पूर्ण तिकीट रिफंड मिळण्याचा हक्क आहे. काही एअरलाइन्स फक्त “व्हाउचर” देतात, परंतु प्रवाशांना ते स्वीकारणे बंधनकारक नाही. DGCA च्या नियमानुसार प्रवाशाने रक्कम स्वरूपात परतावा मागू शकतो.
AirSewa वर नोंदवलेली तक्रार 30 दिवसांच्या आत सोडवणे बंधनकारक असते. जर एअरलाइन्सने दिलेले उत्तर समाधानकारक नसेल, तर प्रवासी DGCA च्या Grievance Cell कडे पुनर्विचार मागणी करू शकतो. या माध्यमातून प्रवाशांना कायदेशीर संरक्षण मिळते आणि एअरलाइन्सना जबाबदार ठेवण्यास मदत होते.