पावसाळ्यात केस खूप गळतात का? मग लगेच शाम्पू किंवा तेल बदलण्याऐवजी काही सोप्या टिप्स फॉलो करा. यामुळे केसगळती नक्कीच नियंत्रणात येईल आणि केस दाटही होतील.
केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि दाट वाढीसाठी स्काल्प (टाळू) स्वच्छ ठेवणं खूप गरजेचं आहे. फक्त उन्हाळ्यातच नाही, तर पावसाळ्यातही घामामुळे आणि धुळीमुळे स्काल्पवर घाण साचते. ही घाण तशीच राहिली तर केसगळती वाढते. त्यामुळे नियमितपणे केस धुवा. पण लक्षात ठेवा, तुमचा शाम्पू सौम्य (mild) असावा, जेणेकरून केसांचे नुकसान होणार नाही आणि केसगळती कमी होईल.
23
2. तेलाने मसाज, पण योग्य पद्धतीने!
अनेकजण केस चांगले वाढावेत म्हणून रोज तेल लावतात, पण तसं करू नये. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा तेलाने स्काल्पला चांगला मसाज करा. नियमित तेल मसाजमुळे रक्ताभिसरण सुधारतं, केसांची मुळं मजबूत होतात आणि केस दाट वाढायला मदत होते. पण पावसाळ्यात केसांना तेल लावून तसंच सोडू नका. साधारण एका तासानंतर केस धुवा. तसेच, ओले केस टॉवेलने जोरात घासू नका, यामुळे केस कमकुवत होतात.
33
3. केसांचं खरं पोषण आतून हवं!
तुम्ही कितीही महागडे शाम्पू किंवा कंडिशनर वापरले, तरी शरीराला आतून पोषण मिळालं नाही तर केसगळती थांबणार नाही. यासाठी आहारात प्रोटीन, लोह, बायोटिन, झिंक आणि जीवनसत्त्वं असलेल्या पदार्थांचा समावेश करा. दिवसभर भरपूर पाणी प्या. तसेच, हेअर ड्रायर, स्ट्रेटनरसारखी हिट स्टायलिंग उपकरणं आणि केमिकलयुक्त उत्पादनं वापरणं टाळा. लक्षात ठेवा, कोणताही उपाय एका दिवसात परिणाम दाखवत नाही, त्यामुळे केसांची काळजी नियमितपणे घ्या आणि धीर धरा.