Black Magic : भारतात अशी काही रहस्यमयी ठिकाणं आहेत, जिथे रात्रीच्या अंधारात आजही तंत्र-मंत्र आणि अघोरी क्रिया चालतात. या ठिकाणच्या गूढ शक्तींच्या कथा ऐकून आजही लोकांच्या मनात भीती निर्माण होते.
उत्तर प्रदेशातील वाराणसी (ज्याला काशी किंवा बनारस असंही म्हणतात) इथे गंगा नदीच्या काठावर मणिकर्णिका घाट आहे. हा घाट अघोरी साधूंचा गड मानला जातो. हे एक स्मशानघाट असून, ते तंत्र-मंत्र आणि तांत्रिक क्रियांसाठी प्रसिद्ध आहे.
25
आसामच्या गुवाहाटीमधील कामाख्या मंदिर
आसामच्या गुवाहाटीमधील कामाख्या मंदिर तांत्रिक क्रियांसाठी ओळखलं जातं. दरवर्षी अंबुबाची मेळ्यादरम्यान देशभरातून तांत्रिक आणि भक्त इथे येतात. या मेळ्याच्या वेळी मंदिर तीन दिवसांसाठी बंद ठेवलं जातं. कामाख्या मंदिर एक अत्यंत रहस्यमयी आणि शक्तिशाली स्थान मानलं जातं.
35
आसाममधील मायोंग गाव
आसाममधील मायोंग गाव जादूटोण्यासाठी ओळखलं जातं. या गावाचा इतिहास अनेक रहस्यमयी कथांनी भरलेला आहे. मायोंगला 'भारताची काळ्या जादूची राजधानी' असंही म्हणतात. असं म्हणतात की, मुघल आणि इंग्रजसुद्धा या गावात यायला घाबरत असत. या गावाचा संबंध थेट महाभारत काळाशी जोडला जातो, जेव्हा भीमाचा मुलगा घटोत्कच इथला राजा होता.
कोलकात्याचा निमतला घाट फक्त अंत्यसंस्कारासाठीच नाही, तर तांत्रिक आणि अघोरींसाठीही एक महत्त्वाचं ठिकाण आहे. ते इथे मृतदेहांसोबत तांत्रिक क्रिया करतात. लोक इथे जादूटोण्याशी संबंधित साधना करण्यासाठीही येतात. या घाटावर अनेक अघोरी साधू राहतात.
55
कुशभद्रा नदीचा घाट, ओडिशा
ओडिशामध्ये कुशभद्रा नदीच्या काठावरही तांत्रिक क्रिया आणि जादूटोणा केला जातो. हे ठिकाण खूपच रहस्यमयी आणि भीतीदायक मानलं जातं. हे स्थान लोकांसाठी भीती आणि उत्सुकता या दोन्ही भावनांचं केंद्र बनलं आहे.