आपल्याला माहिती आहे की प्रत्येक पूजेत तुळशीला खूप महत्त्व आहे, विशेषतः विष्णूच्या पूजेत. पण गणपतीच्या पूजेत तुळस कधीच वापरत नाहीत, हे तुमच्या लक्षात आलंय का? यामागे एका शापाची एक रंजक कथा आहे.
गणपतीचा आवडता सण, गणेश चतुर्थी, २०२६ मध्ये १४ सप्टेंबर रोजी सुरू होईल. या दिवशी भक्त गणपतीची विविध विधींनी पूजा करतात. ते गणपतीला त्याच्या आवडत्या वस्तू अर्पण करतात, ज्यात दुर्वा आणि मोदकांना पूजेत विशेष स्थान आहे.
26
गणपतीच्या पूजेसाठी तुळस वर्ज्य
पौराणिक कथेनुसार, एकदा गणपती गंगा नदीच्या काठावर ध्यान करत बसला होता. तिथून जाणाऱ्या देवी तुळशीची नजर त्याच्यावर पडली आणि ती त्याच्या दिव्य रूपावर मोहित झाली. तिने गणेशाला लग्नाची मागणी घातली, पण गणेशाने ती नाकारली. आपण 'ब्रह्मचारी' असून लग्न करण्याची इच्छा नाही, असं गणेशाने तिला सांगितलं. या नकारामुळे देवी तुळस खूप चिडली आणि इथूनच शापाच्या कथेला सुरुवात झाली.
36
तुळशीचा श्राप
गणेशाने लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याने संतप्त झालेल्या तुळशीने त्याला शाप दिला, 'तुझं लग्न तुझ्या इच्छेविरुद्ध नक्की होईल!' याच शापामुळे अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये गणेशाचा विवाह रिद्धी आणि सिद्धी यांच्याशी झाल्याचा उल्लेख आढळतो. तिच्या शापाने चिडलेल्या गणेशानेही तिला प्रतिशाप दिला, 'तुझा विवाह एका असुराशी होईल.'
गणेशाचा प्रतिशाप ऐकून तुळशीला आपली चूक कळली आणि तिने क्षमा मागितली. गणेशाचं मन द्रवलं आणि त्याने तिला एक वरदान दिलं. तो म्हणाला, 'तू भगवान विष्णूची प्रिय होशील आणि जगभरात एक पवित्र वनस्पती म्हणून तुझी पूजा केली जाईल.' यामुळेच आजही भगवान विष्णू आणि कृष्णाच्या पूजेत तुळशीला खूप महत्त्वाचं स्थान आहे. पण, या कथेमुळे गणेशाच्या पूजेत तुळस वापरली जात नाही.
56
तुळशीची पान वाहणं टाळतात
साधारणपणे, गणपतीला तुळस वाहण्याची प्रथा नाही. ब्रह्मवैवर्त पुराणातील 'गणपती खंडात' त्यांच्यातील शापाच्या कथेचा उल्लेख आहे. मात्र, काही परंपरांनुसार गणेशाच्या विशिष्ट रूपांसाठी तुळस वापरली जाऊ शकते. त्यामुळे, सामान्यतः गणपतीच्या पूजेत तुळशीची पानं वाहणं टाळलं जातं. त्याऐवजी दुर्वांना अधिक महत्त्व दिलं जातं.
66
चुकून तुळस वाहिली तर?
धार्मिक मान्यतेनुसार, पूजेदरम्यान अजाणतेपणे झालेल्या चुकांना घाबरण्याची गरज नाही. जर तुम्ही चुकून गणपतीला तुळस वाहिली, तर ती आदरपूर्वक काढून टाका आणि क्षमा मागा. नकळत झालेल्या चुकीला पाप मानले जात नाही. खरी गोष्ट म्हणजे पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने गणपतीची पूजा करणे.