Blood Sugar Control : ब्लड शुगर नियंत्रणात कशी ठेवावी? वाचा 5 आयुर्वेदिक उपाय

Published : Nov 14, 2025, 11:30 AM IST

Blood Sugar Control : ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी औषधे जितकी महत्त्वाची आहेत, तितकेच आयुर्वेदिक उपाय, संतुलित आहार आणि नियमित व्यायामही महत्त्वाचे आहे. 

PREV
16
ब्लड शुगर नियंत्रणात कशी ठेवावी?

मधुमेह किंवा वाढलेला ब्लड शुगर हा आज अनेकांसाठी गंभीर आरोग्याचा विषय बनला आहे. चुकीची जीवनशैली, ताणतणाव, अनियमित आहार आणि व्यायामाचा अभाव यामुळे रक्तातील साखरेची पातळी लवकर वाढते. आयुर्वेदानुसार, शरीरातील दोष संतुलित ठेवून आणि नैसर्गिक उपायांचा अवलंब करून ब्लड शुगर नियंत्रित करता येऊ शकतो. औषधोपचारासोबतच आयुर्वेदिक उपायांचा नियमित वापर केल्यास शरीराची ग्लुकोज प्रक्रिया सुधारते आणि मधुमेहाचा धोका कमी होतो. खाली दिलेले पाच उपाय सुरक्षित, घरगुती आणि सहज अवलंबता येण्यासारखे आहेत.

26
मेथीदाण्याचा वापर

आयुर्वेदात मेथीला (Fenugreek) रक्तातील शर्करा नियंत्रित ठेवण्यासाठी अत्यंत उपयुक्त मानले आहे. मेथीदाण्यांमधील विद्राव्य फायबर पचन मंदावते, ज्यामुळे ग्लुकोज हळूहळू रक्तात मिसळते. दोन चमचे मेथीदाणे रात्री भिजत ठेवून सकाळी रिकाम्या पोटी सेवन करावेत. काही जण मेथी पावडर कोमट पाण्यासोबत घेतात. सातत्याने वापर केल्यास इन्सुलिनची क्रिया सुधारते आणि अचानक वाढणारी शुगर पातळी स्थिर राहते.

36
कारली

करले हे आयुर्वेदातील प्रसिद्ध डायबेटिक-फ्रेंडली अन्न आहे. त्यातील चारंटिन आणि पॉलिपेप्टाइड-P हे घटक इन्सुलिनसारखे कार्य करतात. करल्याचा रस सकाळी रिकाम्या पोटी पिण्याची आयुर्वेदात शिफारस केली जाते. कच्चे करले चिरून त्याचा हलका रस काढून दररोज एक ग्लास घेतल्यास ग्लुकोजचे शोषण कमी होते आणि ब्लड शुगर नैसर्गिकरीत्या कमी होण्यास मदत होते. मात्र, करला जास्त कडू असल्यास त्यात थोडे पाणी मिसळून हलकं करून घेता येते.

46
दालचिनी (Cinnamon)

दालचिनीमध्ये असलेले सिनॅमाल्डिहाइड घटक इन्सुलिनची कार्यक्षमता वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतात. दैनंदिन आहारात दालचिनीचा समावेश केल्यास ब्लड शुगरची पातळी स्थिर राहते. कोमट पाण्यात अर्धा चमचा दालचिनी पावडर मिसळून सकाळी सेवन केल्यास शरीरातील ग्लुकोज मेटाबॉलिझम सुधारतो. दही, सूप किंवा हर्बल टीमध्येही दालचिनीचा वापर केला तर दिवसातील अनियमित शुगर स्पाईक कमी होतात.

56
व्यायाम आणि योग

आयुर्वेदानुसार, शरीर सक्रिय ठेवणे म्हणजे शरीरातील दोषांचे संतुलन राखणे. मधुमेहासाठी रोज किमान ३०-४० मिनिटे चालणे, सूर्यनमस्कार, बटरफ्लाय पोझ, कपालभाती आणि प्राणायाम हे अतिशय फायदेशीर मानले जातात. व्यायामामुळे शरीरातील पेशी इन्सुलिन अधिक चांगल्या प्रकारे स्वीकारतात. तणाव कमी करणारा प्राणायाम मानसिक आरोग्य सुधारतो, ज्याचा मधुमेहावर अप्रत्यक्षपणे सकारात्मक परिणाम होतो.

66
हळद आणि आवळा

हळदीतील कर्क्यूमिन आणि आवळ्यातील व्हिटॅमिन-C हे दोन्ही घटक शरीरातील सूज कमी करतात, पचन सुधारतात आणि यकृताच्या कार्यावर सकारात्मक परिणाम करतात. हळदीचे दूध किंवा हळदीचे कोमट पाणी सकाळी घेणे आणि आवळा रस किंवा कॅप्सूल घेतल्यास शरीरातील ग्लुकोजचा प्रवाह संतुलित राहतो. दोन्हीही घटक नैसर्गिक डिटॉक्स म्हणून कार्य करून शुगर नियंत्रणाला मोठी मदत करतात.

Read more Photos on

Recommended Stories