ज्योतिषशास्त्रानुसार, शनीची साडेसाती साडेसात वर्षे चालते. या काळात खूप संयम ठेवावा लागतो. तुमच्या एका छोट्या चुकीमुळेही शनिदेव नाराज होऊ शकतात. जाणून घेऊया साडेसातीमध्ये कोणती कामं करणं टाळलं पाहिजे.
शनीची साडेसाती
ज्योतिषशास्त्रात असं मानलं जातं की, जेव्हा शनीची साडेसाती सुरू होते, तेव्हा तिचा प्रभाव जवळपास साडेसात वर्षे राहतो. शनीची गती मंद असल्यामुळे या काळात व्यक्तीची अनेक कामं उशिरा होऊ शकतात. तुम्ही कितीही मेहनत केली तरी त्याचं फळ मिळायला वेळ लागू शकतो. साडेसातीचा काळ हा व्यक्तीच्या मागच्या कर्मांची फळं भोगण्याचा काळ मानला जातो. त्यामुळे या काळात आपल्या वागण्या-बोलण्याबद्दल आणि कर्मांबद्दल जास्त सावध राहायला हवं. काही चुका केल्यास शनिदेवाचा कोप होऊ शकतो.
साडेसातीच्या काळात कोणत्या गोष्टी टाळाव्यात?
साडेसातीच्या काळात गरीब, दुर्बळ आणि असहाय्य लोकांना कोणत्याही प्रकारे त्रास देऊ नये. त्यांच्या सन्मानाला धक्का लागेल असं वागू नये. असं केल्यास शनिदेव नाराज होऊ शकतात.
आपल्याकडे असलेल्या पैसा, ज्ञान, पद किंवा यशाबद्दल अहंकार बाळगू नये. दुसऱ्यांना कमी लेखणं चांगलं नाही. शनिदेव असा अहंकार मोडून काढतात असं मानलं जातं.
चोरी, दारू पिणं, जुगार खेळणं किंवा लग्नानंतर अनैतिक संबंध ठेवणं, अशा गोष्टींमध्ये अडकलेल्यांना शनिदेव शिक्षा देतात, असं ज्योतिषशास्त्रात सांगितलं आहे.
साडेसातीमध्ये आळस आणि काम पुढे ढकलण्याची सवय टाळावी. कष्ट न करता फळाची अपेक्षा केल्यास कामात अडथळे येऊ शकतात.
जे लोक नैतिकता, कायदा आणि नियम पाळत नाहीत, त्यांना साडेसातीच्या काळात अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
खोटं बोलणं, दुसऱ्यांना फसवणं, कपट किंवा द्वेष अशा गोष्टींपासून दूर राहावं. अशी नकारात्मक कर्मं साडेसातीमध्ये समस्या निर्माण करू शकतात.
साडेसातीमध्ये विनाकारण वाद घालणं आणि सतत रागवणं स्वतःसाठीच हानिकारक ठरू शकतं. यामुळे मानसिक शांतता बिघडून तणाव आणि झोप न लागण्यासारख्या समस्या येऊ शकतात.
शनिदेवाला प्रसन्न ठेवण्यासाठी काय करावं?
साडेसातीच्या काळात गरीब, कामगार, सफाई कर्मचारी, रुग्ण आणि असहाय्य लोकांना शक्य तितकी मदत करा.