
छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषदेत मंत्री संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीवर प्रतिक्रिया दिली. पक्षातील काही खासदार संपर्काबाहेर असल्याच्या चर्चांदरम्यान उद्धव ठाकरे संकटाच्या काळात अशा बैठका घेत असल्याचा टोला त्यांनी लगावला. पक्षातील घडामोडी आणि राजकीय चर्चांवरही त्यांनी भाष्य केले.