
नाशिक TCS प्रकरणावरून मंत्री संजय शिर्साट यांनी असदुद्दीन ओवैसी आणि इम्तियाज जलील यांच्यावर जोरदार टीका केली. निदा खान 43 दिवस फरार का होती? असा सवाल करत शिर्साटांनी चौकशीला सामोरं जाण्याचं आवाहन केलं. यासोबतच मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनाला समर्थन देत त्यांनी बंगालमधील घुसखोरी, मतदार पडताळणी आणि सीमा सुरक्षेवरही मोठं वक्तव्य केलं.