
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी NEET पेपरफुटी प्रकरणावरून केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारवर जोरदार टीका केली. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ होत असल्याचा आरोप करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरले. महाराष्ट्र हे पेपरफुटीचे मोठे केंद्र असल्याचाही दावा त्यांनी केला.