
दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह संसदेत उपस्थित नसल्याबद्दल टीका केली. संसद परिसरात दिसत असतानाही ते सभागृहात येत नसल्याचा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पत्रकार परिषद टाळल्याच्या मुद्द्याचाही उल्लेख करत, काँग्रेसने त्यांना 'गुंगी बाहुली' म्हटल्याचे सांगत अमित शाहांवरही त्याच शब्दांत निशाणा साधला. यावेळी त्यांनी सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टमधील कथित आर्थिक गैरव्यवहाराचा मुद्दाही उपस्थित केला. या प्रकरणात साधू-संतांचा कोणताही संबंध नसून भाजपशी संबंधित लोकांवर आरोप असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच साधू-संतांचा कधीही अपमान केला नसल्याचे सांगत, RSS कार्यकर्ते आणि त्यांच्या पुढील पिढीशी संवाद साधण्यास आपण तयार असल्याचेही संजय राऊत यांनी म्हटले.