
दिल्ली: दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षांचे नेते एकत्र आले. यावेळी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी प्रधानमंत्र्यांच्या घरासमोर धरणे धरले आहे. त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी, पार्टी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, पवन खेरा आणि इतर नेते उपस्थित होते.
राहुल गांधी लिहितात की, सरकारने एक दिवसापूर्वी विद्यार्थ्यांना अमानुष अत्याचार केला. आता सरकार कोणतीही जबाबदारी घेत नाही आणि संसदेत चर्चा करत नाही. सरकार याबद्दल उत्तर देत नाही. गृहमंत्री आणि प्रधानमंत्री यांनी युवांचे भविष्य बरबाद करण्यासाठी राजीनामा द्यायला हवं. यावेळी काँग्रेस नेत्यांनी विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी केली.
राहूल गांधी यांनी काँग्रेस नेत्यांसोबत पंतप्रधानांच्या घरासमोर धरण धरलं आहे. दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह आंदोलन करणाऱ्या काँग्रेस नेत्यांना अटक केली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी राहुल यांनी केली. प्रियांका गांधींनी यावेळी पोलिसांचा प्रतिकार केला. त्याआधी पोलिसांनी अखिलेश यादव यांना ताब्यात घेतलं होतं.