
मुंबईतील पावसामुळे निर्माण झालेल्या पाणी साचण्याच्या समस्येवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या किशोरी पेडणेकर यांनी BJP वर जोरदार टीका केली. अंधेरी परिसरातील परिस्थितीची पाहणी करताना त्यांनी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि पायाभूत सुविधांच्या कामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच आगामी काळात संपूर्ण मुंबई ठप्प होण्याची शक्यता असल्याचा इशाराही त्यांनी दिला.