
नवी दिल्ली : गुरुवारी संसद भवनात एक मोठा राडा झाला. संसद अधिवेशनादरम्यान NDA आणि INDIA आघाडीचे खासदार 'मकर द्वारा'समोरच एकमेकांना भिडले. त्यामुळे काही वेळासाठी परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. दोन्ही गटांमध्ये फक्त शाब्दिक चकमक झाली नाही, तर प्रकरण धक्काबुक्की आणि थेट मारामारीपर्यंत पोहोचलं. संसदेच्या आवारात झालेल्या या गोंधळामुळे एकच खळबळ उडाली आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना तातडीने धाव घ्यावी लागली.
#पाहा | दिल्ली: काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, खासदार मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, प्रियंका गांधी वढेरा, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि इतर नेते संसद परिसरातील मकर द्वारावर INDIA आघाडीच्या आंदोलनात सामील झाले.
NDA खासदारही... pic.twitter.com/87Oy22Osxl— ANI (@ANI) July 23, 2026
खासदारांमध्ये घोषणाबाजी सुरू असताना वातावरण इतकं तापलं की, हाणामारीची परिस्थिती निर्माण झाली. ANI या वृत्तसंस्थेनुसार, CPI(M) चे खासदार जॉन ब्रिटास यांनी भाजप नेते अरुण सिंह यांच्या हातातून एक पोस्टर हिसकावून घेतलं. या घटनेनंतर दोन्ही बाजूचे खासदार एकमेकांच्या अगदी जवळ आले आणि जोरजोरात ओरडू लागले. प्रकरण हाताबाहेर जात असल्याचं पाहून संसद सुरक्षा कर्मचारी लगेचच पुढे सरसावले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून त्यांनी दोन्ही गटांमध्ये एक 'मानवी साखळी' (Human Chain) तयार केली आणि दोन्ही बाजूच्या खासदारांना वेगळं केलं.
#पाहा | दिल्ली: संसद परिसरात मकर द्वारावर NDA आणि INDIA या दोन्ही आघाड्यांचे खासदार आंदोलन करत आहेत. pic.twitter.com/P5IElPjlot
— ANI (@ANI) July 23, 2026
या गदारोळात काँग्रेस खासदार प्रियंका गांधी वाड्रा आणि भाजप नेत्यांमध्येही जोरदार शाब्दिक युद्ध रंगलं. भाजप खासदार संबित पात्रा यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केले. माध्यमांशी बोलताना पात्रा म्हणाले, "हे पहिल्यांदा घडत नाहीये. काँग्रेस जाणूनबुजून संसदेबाहेर असे सीन तयार करते आणि सभागृहात काळे कपडे, बॅनर आणि पोस्टर वापरून देशाचा मौल्यवान वेळ वाया घालवते." त्यांनी दावा केला की, सरकार पेपर लीकच्या मुद्द्यावर कठोर कायदा बनवण्यासाठी आणि सखोल चर्चा करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. सरकारने यासंदर्भात विद्यार्थी आणि सोनम वांगचुक यांच्याशी चर्चाही केली आहे, पण विरोधक चर्चेपासून पळ काढत आहेत.
Nothing is more important than the welfare and future of our youth!
We have decided to set up fast-track courts to ensure swift and stringent punishment for those involved in paper leaks. Have directed the concerned authorities and officials to take all necessary steps in this…— Narendra Modi (@narendramodi) July 23, 2026
You are the one who has harmed the future of our youth the most.
You allowed and encouraged the total capture and destruction of our education system - and protected every person responsible for it.
The students’ demands are clear:
1. Sack Dharmendra Pradhan.
2. Apologise to… https://t.co/0MK4wPMNiK— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 23, 2026
संसदेतील या गोंधळाच्या काही वेळापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेपर लीक प्रकरणावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली होती. दोषींना शिक्षा देण्यासाठी 'फास्ट-ट्रॅक कोर्ट' स्थापन करण्याची घोषणा त्यांनी केली होती. पण या आश्वासनानंतरही विरोधक शांत झालेले नाहीत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधानांच्या या घोषणेवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला चढवला आहे.
राहुल गांधींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिलं, "तुम्हीच आमच्या तरुणांच्या भविष्याचं सर्वात जास्त नुकसान केलं आहे. तुम्हीच शिक्षण व्यवस्थेवर कब्जा करू दिला आणि ती उद्ध्वस्त केली. याला जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला तुम्ही वाचवत आहात." जोपर्यंत शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत आणि सरकार विद्यार्थ्यांची माफी मागत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, असं राहुल यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे सरकार आणि विरोधकांमधील हा संघर्ष आता आर-पारच्या लढाईत बदलला आहे.