
महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशनादरम्यान आज राजकीय वातावरण तापलं. बिष्णोई गँगकडून आमदाराला धमकी दिल्याचा मुद्दा सभागृहात चर्चेत आला. बाबा सिद्दीकी प्रकरणानंतर या नव्या धमकीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून विरोधकांनी सरकारकडे कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले.