30 एप्रिल 2025 च्या मुंबई, महाराष्ट्र, देश-विदेशातील ताज्या घडामोडींचा आढवा घेण्यासाठी वाचत रहा आमचे लाइव्ह अपडेट्स…

12:07 AM (IST) May 01
मुंबई ः १५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला असला तरी त्यावेळी वेगवेगळी राज्ये उदयाला आली नव्हती. प्रचंड संघर्ष आणि रक्तरंजित लढ्यानंतर एकसंध महाराष्ट्राची निर्मिती झाली. त्यामुळे हा दिवस महाराष्ट्रात मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो.
11:17 PM (IST) Apr 30
गुरुग्राममध्ये बुधवारी झालेल्या रोमांचक अंतिम सामन्यात मराठी व्हल्चर्सनी तमिळ लायन्सला ४०-३० असा पराभव करून जीआय-पीकेएल २०२५ पुरुषांचा किताब जिंकला.
11:11 PM (IST) Apr 30
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारत सरकारने ३० एप्रिल ते २३ मेपर्यंत पाकिस्तानी विमानांना आपल्या हवाईक्षेत्रात प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. यामध्ये लष्करी आणि नागरी दोन्ही प्रकारच्या विमानांचा समावेश आहे.
09:23 PM (IST) Apr 30
पुणे पेट्रोल डिलर्स असोसिएशनने १ मे २०२५ पासून पुणे ग्रामीण भागातील टॉरेंट गॅसद्वारे संचालित पंपांवर CNG विक्री स्थगित करण्याची घोषणा केली आहे. अनियमित पुरवठा आणि सततच्या खंडामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
08:02 PM (IST) Apr 30
राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी आज (दि.३०) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.
06:29 PM (IST) Apr 30
पश्चिम बंगालमधील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महागाई भत्ता (Dearness allowance) मध्ये मोठी वाढ झाल्यानंतर आता पुन्हा एकदा भत्ता वाढवण्याचा निर्णय ममता बॅनर्जी सरकारने घेतला आहे. ५५०० रुपये खात्यात जमा होणार आहेत.
06:23 PM (IST) Apr 30
काही तारखांना जन्मलेले मुले केवळ स्वतःच्या आयुष्याबद्दलच नव्हे तर त्यांच्या भावंडांबद्दलही विचार करतात. त्यामुळे त्यांना 'दि बेस्ट ब्रदर' हा पुरस्कार दिला जाऊ शकतो.
04:56 PM (IST) Apr 30
महाराष्ट्र सरकारने नवीन इलेक्ट्रिक वाहन (EV) धोरण 2025 जाहीर केले आहे, ज्यामध्ये निवडक महामार्गांवर टोल सूट, नवीन वाहनांच्या नोंदणीवर सवलत आणि इतर फायदे समाविष्ट आहेत.
04:50 PM (IST) Apr 30
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीने आगामी जनगणना जातीनिहाय करण्याचा निर्णय घेतला आहे.
04:40 PM (IST) Apr 30
विजय दिन सोहळा: पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाच्या विजय दिन सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत. क्रेमलिनच्या प्रवक्त्याने याची पुष्टी केली आहे. मात्र, अधिकृत कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
04:06 PM (IST) Apr 30
Sameer Dombe Story: नोकरी सोडून शेतीकडे वळलेल्या समीर डोंबे यांनी 'पावित्रक' ब्रँड अंतर्गत अंजीराची शेती करून यशाची नवी व्याख्या लिहिली. थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याच्या धोरण, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी कोविड काळात १३ लाखांची उलाढाल केली.
03:51 PM (IST) Apr 30
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (राकांपा) ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ जणांच्या मृत्युवर शोक व्यक्त करताना सांगितले की, आपला लढा पाकिस्तानविरुद्ध आहे, भारतातील सामान्य जनतेविरुद्ध नाही.
03:34 PM (IST) Apr 30
03:14 PM (IST) Apr 30
उन्हाळ्यातील उष्णतेमुळे होणाऱ्या डोकेदुखी, कोंडा आणि केसगळतीवर दही एक सोपा आणि नैसर्गिक उपाय आहे. दहीतील थंडावा आणि प्रोबायोटिक गुणधर्म टाळू शांत ठेवतात आणि कोंडा कमी करतात.
02:01 PM (IST) Apr 30
Pahalgam Terror Attack : जपानमधील टोकियो येथील भारतीय दूतावास आणि भारतीय समुदायाने जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील बळींना श्रद्धांजली वाहिली.
01:03 PM (IST) Apr 30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू अधिकारी देवेन भारती यांची मुंबई पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या गृहविभागाने यासंदर्भात आदेश काढला आहे. मुंबई पोलिस आयुक्त पदाचा दर्जा डीजीपी रॅन्कचा समजला जातो.
12:16 PM (IST) Apr 30
Sanjay Raut on Pahalgam Terror Attack : संजय राउत यांनी पहलगाम हल्ल्यावरुन गृहमंत्रालयावर जोरदार टीका केली आहे. यावेळी संजय राउत यांनी असेही म्हटले की, पंतप्रधानांनी शाहांचा राजीनामा घ्यावा.
11:56 AM (IST) Apr 30
11:11 AM (IST) Apr 30
मुंबई ः भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर आज (दि. ३०) निवृत्त झाले. सुमारे तीन वर्षे ते या पदावर कार्यरत होते. त्यांच्यानंतर कोण मुंबईचे पोलिस आयुक्त होणार, याची चर्चा सुरु झाली आहे.
10:38 AM (IST) Apr 30
ठाणे शहरातील नौपाडा विभागातील उबाठा गटाच्या २० पदाधिकाऱ्यांनी आज (दि. ३०) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आनंदआश्रमात शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
10:35 AM (IST) Apr 30
10:10 AM (IST) Apr 30
तमिळनाडूमधील विरुधुनगर जिल्ह्यातील मुथंडीपुरम गावातील फटाक्याच्या गोदामाला आग लागल्याची घटना घडली आहे.
09:49 AM (IST) Apr 30
सिंहचलम येथील श्री वराह लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिराचा स्लॅब कोसळून मृत्यू झाल्याने आँध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी मृत व्यक्तींच्या कुटुंबाला 25 लाख तर जखमींच्या कुटुंबाला 3 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.