Indian Railways: भारतीय रेल्वेच्या नियमांनुसार काही लोकांना ट्रेनमधून मोफत प्रवास करण्याची सुविधा मिळते. अर्थात, यासाठी काही अटी आणि नियम लागू आहेत. त्यामुळे प्रवाशांनी तिकीट बुक करताना हे नियम व्यवस्थित समजून घेणे महत्त्वाचे आहे.
रेल्वे प्रवास हा भारतीयांच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. कुटुंबासोबत प्रवास करताना मुलांच्या तिकीट नियमांबद्दल अनेकांना प्रश्न पडतात. 'किती वर्षांपर्यंतच्या मुलांना तिकीट लागत नाही?' किंवा 'अर्धे तिकीट कधी काढावे?' असे प्रश्न नेहमी विचारले जातात. चला तर मग, रेल्वेच्या तिकीट नियमांबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
25
लहान मुलांना प्रवास मोफत, पण अट लागू
भारतीय रेल्वेच्या नियमांनुसार, 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी वेगळे तिकीट काढण्याची गरज नाही. जन्मापासून ते 4 वर्षांपर्यंतची मुले पालकांसोबत मोफत प्रवास करू शकतात. पण, या नियमानुसार मुलांना वेगळी सीट किंवा बर्थ मिळत नाही. त्यांना पालकांच्या सीटवरच प्रवास करावा लागतो. जर पालकांना मुलांसाठी वेगळी सीट हवी असेल, तर ते पूर्ण शुल्क भरून तिकीट बुक करू शकतात.
35
अर्धे तिकीट काढले तरी सीट नाही
5 ते 12 वर्षांच्या मुलांसाठी रेल्वेचे नियम थोडे वेगळे आहेत. या वयोगटासाठी सवलतीच्या दरात तिकीट मिळते, पण त्यात वेगळी सीट दिली जात नाही. प्रवासात मुलांसाठी वेगळी सीट किंवा बर्थ हवा असेल, तर पूर्ण शुल्क भरून तिकीट बुक करावे लागते. 12 वर्षांवरील मुलांना प्रौढ प्रवासी मानले जाते. ऑनलाइन तिकीट बुक करताना मुलांचे वय अचूक नमूद करणे आवश्यक आहे. TTE वयाच्या पुराव्यासाठी कागदपत्रे मागू शकतात.
कुटुंबासोबत रेल्वे प्रवासाला निघण्यापूर्वी मुलांच्या वयानुसार योग्य तिकीट निवडणे महत्त्वाचे आहे. पैसे वाचवण्यासाठी नियमांकडे दुर्लक्ष केल्यास दंड होऊ शकतो. योग्य माहिती घेऊन तिकीट बुक केल्यास तुम्ही दंड टाळू शकता आणि तुमचा प्रवास आरामदायक व आनंदी करू शकता.
55
यांनाही आहे मोफत प्रवासाची सोय
लहान मुलांशिवाय काही प्रौढ व्यक्तींनाही रेल्वेमध्ये मोफत प्रवासाची सोय आहे. भारत सरकारने दिलेले सर्वोच्च शौर्य पुरस्कार मिळवलेल्यांचा सन्मान करण्यासाठी रेल्वेने ही सुविधा दिली आहे. वीर चक्र, अशोक चक्र, कीर्ती चक्र, महावीर चक्र, परमवीर चक्र आणि शौर्य चक्र पुरस्कार विजेते रेल्वेतून मोफत प्रवास करू शकतात. इतकेच नाही, तर या पुरस्कार विजेत्यांसोबत एका मदतनीसालाही मोफत प्रवासाची परवानगी आहे.