
एलपीजी गॅसच्या वाढत्या दरांमध्ये आणि जागतिक तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर IIT बॉम्बेने विकसित केलेली बायोमास गॅसिफिकेशन टेक्नॉलॉजी सध्या चर्चेत आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने कोरड्या पानांपासून स्वयंपाकासाठी गॅस तयार केला जातो. या प्रकल्पामुळे गॅसचा वापर कमी होतो, खर्चात मोठी बचत होते आणि पर्यावरणालाही फायदा होतो. कॅम्पसमध्ये यशस्वीरित्या वापर झाल्यानंतर आता ही तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर लागू करण्याची तयारी सुरू आहे. ऊर्जा संकटावर हा एक मोठा आणि शाश्वत उपाय ठरू शकतो.