
मुंबईत आयोजित ImagiNxt India Festival of Technology & Innovation कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी Artificial Intelligence च्या वाढत्या प्रभावावर भाष्य केलं. AI चा वापर सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी कसा होऊ शकतो, यावर त्यांनी सविस्तर भूमिका मांडली. 2047 पर्यंत विकसित महाराष्ट्र आणि विकसित भारत घडवण्यासाठी राज्य सरकार AI मिशनशी जोडून काम करत असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. शेती, अर्थव्यवस्था, गुन्हेगारी नियंत्रण आणि तंत्रज्ञान क्षेत्रात AI मुळे मोठे बदल घडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.