
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी LPG आणि इंधन दरवाढीवर भाष्य करत जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे दरांवर परिणाम होत असल्याचे सांगितले. केंद्र सरकार या परिस्थितीवर लक्ष ठेवून असून योग्य वेळी आवश्यक निर्णय घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यासोबतच राज्यातील अंमली पदार्थांविरोधातील शून्य-सहनशीलता धोरण, कमी पावसाच्या शक्यतेमुळे शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या सूचना आणि इथेनॉल उत्पादनामुळे शेतकऱ्यांना होणाऱ्या फायद्यांबाबतही त्यांनी माहिती दिली.