काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यसभा खासदार हुसेन दलवाई यांनी विविध राजकीय घडामोडींवर भाष्य करत मोदी सरकारवर टीका केली. राहुल गांधी यांनी देशात आणीबाणीसारखी परिस्थिती असल्याच्या वक्तव्याला समर्थन देत त्यांनी महागाई, रुपयाचे अवमूल्यन, परीक्षा घोटाळे आणि प्रशासनातील अपयशांवर प्रश्न उपस्थित केले. तसेच बंगालमधील राजकीय घडामोडी, ईडीची कारवाई आणि दिल्लीतील आगीच्या घटनेची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली.