
काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी विधान परिषद निवडणुकीपूर्वी महायुतीवर घोडेबाजार आणि पैशांच्या वापराचे गंभीर आरोप केले. नगरसेवकांना पैसे देऊन फोडाफोडी सुरू असल्याचा दावा करत त्यांनी भाजपवर लोकशाही धोक्यात आणल्याचा आरोप केला. पुण्यातील विषारी दारू प्रकरण, पोलिस कारभार आणि राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवरूनही त्यांनी सरकारला लक्ष्य केलं.