
आदित्य ठाकरे यांनी बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना पक्षफोडीच्या राजकारणावर भाष्य केले. लोकशाही धोक्यात असल्याचे त्यांनी म्हटले. महागाई, पेपरफुटी, शेतकरी प्रश्न, पाणीटंचाई आणि जनतेच्या मुद्द्यांवर चर्चा होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच विरोधी पक्ष लोकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरत राहतील असेही त्यांनी स्पष्ट केले.