
मुंबई: सध्याच्या काळात अपघात मोठ्या प्रमाणावर वाढत चालले आहेत. नवी मुंबईतील तळोजा भागात भीषण अपघाताची घटना घडली आहे. येथे स्पीडमध्ये येणाऱ्या कारचालकाने दहा जणांना कारने उडवलं. त्यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला. ड्रॉयव्हरच गाडीवरच नियंत्रण सुटून हा अपघात झाला. या अपघातात आठ जण जखमी असून गाडीचा चालक घटनास्थळावरून पळून गेला. अपघातामुळं जागेवरच दोघांचा मृत्यू झाला.
अपघातात जखमी झालेल्या लोकांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. कारचा स्पीड एवढा भयानक होता की ती रस्त्यावरून फुटपाथवर जाऊन तीन तिथल्या दुकानांना उडवलं. या फुटपाथवर टपऱ्या होत्या, त्या टपऱ्यांना या गाडीने उडवलं. तो गाडी चालवणारा ड्रायव्हरनं ड्रिंक करून गाडी चालवली होती का हा प्रश्न विचारला जात आहे. पोलीस याबाबतची अधिक चौकशी करत आहे.
या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या कारमध्ये एकटा कारचालक होता, त्याच्यासोबत कोणी नव्हतं असं सांगितलं जात आहे. याबाबतचा अधिक तपास पोलिसांच्या वतीने केला जात आहे.