राजकारणात काय करायला हवं, चाणक्य नितीमध्ये नेमकं काय सांगितलं?
Utility News Jan 19 2026
Author: vivek panmand Image Credits:pinterest AI Modified
Marathi
राजा बुद्धिमान असावा
राजा बलवान नव्हे, बुद्धिमान असावा कारण बुद्धीशिवाय सत्ता टिकत नाही. त्यामुळं बुद्धीचा वापर करून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करा.
Image credits: pinterest AI Modified
Marathi
शत्रू ओळखणं महत्त्वाचं
राजकारणात मित्र हे कायम नसतात आणि शत्रू हेही कायम नसतात. आपण परिस्थितीनुसार निर्णय घेऊनच मित्र आणि शत्रू यांच्याबद्दल ठरवावा. गरजेला कोण कधी उपयोगाला येईल सांगता येत नाही.
Image credits: pinterest
Marathi
गुप्तचर यंत्रणा आवश्यक
आपल्याला राजकारणात सर्वात महत्वाचं म्हणजे गुप्तचर यंत्रणा ठेवणं खूप गरजेचं असत. राज्य मजबूत ठेवायचं असेल तर कधी आणि कुठं काय चालू आहे यावर लक्ष ठेवायला हवं.
Image credits: pinterest
Marathi
जनतेचं समाधान सर्वात महत्त्वाचं
जनतेचा आधार नसेल तर कोणतीही सत्ता दीर्घकाळ टिकू शकत नाही. त्यामुळं कायम जनतेची सेवा करत राहायला हवं, तरच आपल्याला राजकारणात दीर्घकाळ टिकून राहता येत.
Image credits: adobe stock
Marathi
योग्य वेळी कठोर निर्णय
राजकारणात दयाळूपणा गरजेचा असतो, पण कधी कधी दयाळूपणा सोडून निर्णय घ्यावे लागतात. अशावेळी कठोर निर्णय घेतले तरच आपल्याला फायदा होऊ शकतो.