कोमट पाण्याने अंघोळ न करता थंड पाण्याने अंघोळ करा. बर्फाच्या क्युब्स एका कापडात गुंडाळून हलकेच प्रभावित भागावर लावा.
ताज्या कोरफडीचा गर काढून थेट त्वचेवर लावा. कोरफडीमध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी घटक असतात जे जळजळ शांत करतात.
साजूक तूप किंवा थंड नारळाचे तेल लावल्याने त्वचेतील उष्णता कमी होते. त्वचा कोरडी पडत असेल तर हे नैसर्गिक मॉइश्चरायझर मदत करू शकतात.
काकडीच्या किंवा बटाट्याच्या रसाने त्वचेची जळजळ शांत होते. हे थंडसर ठेवून त्वचेवर लावल्यास आराम मिळतो.
दह्याच्या थंड थरामुळे जळजळ कमी होते. कापसाच्या मदतीने थंड दूध लावल्यास त्वचा शांत होते.
उन्हामुळे शरीरातील पाणी कमी होते, त्यामुळे त्वचा कोरडी होते. भरपूर पाणी, ताक, लिंबूपाणी आणि नारळ पाणी प्या.
उन्हाळ्यात काकडीचे असे करा सेवन, आरोग्य राहिल हेल्दी
पावभाजी कशी बनवायची?, मुंबईच्या स्ट्रीट फूडचा घरच्या घरी घ्या आस्वाद!
केस गळतीच्या समस्येवर रामबाण उपाय, तयार करा मेथी हेअर मास्क
उन्हाळ्यात डोळ्यांची काळजी कशी घ्यावी?, जाणून घ्या सोप्या टिप्स!