Lifestyle
महिलांनी या 5 ठिकाणी केस मोकळे सोडून फिरणे टाळा, अन्यथा.....
हिंदू धर्मात महिलांनी केस मोकळे सोडून फिरणे अयोग्य मानले आहे. अशी मान्यता आहे की, केस मोकळे सोडल्याने नकारात्मक ऊर्जेचा तुमच्यावर प्रभाव पडू शकतो.
काही खास ठिकाणी नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव अधिक असतो. अशा ठिकाणी महिलांनी केस मोकळे सोडणे अशुभ मानले जाते. याबद्दलच जाणून घेऊया...
विहीरीजवळ नकारात्मक ऊर्जा असते असे मानले जाते. यामुळे महिलांनी कधीच सकाळी अथवा रात्रीच्या वेळेस चुकूनही विहीरीजवळ केस मोकळे सोडू नये.
एखाद्या मोठ्या व घटदाट झाडाजवळ महिलांनी केस मोकळे सोडू नये. कारण अशा झाडांजवळ नकारात्मक ऊर्जा अधिक प्रमाणात सक्रिय असतात.
रात्रीच्या वेळेस नदीच्या आसपास जाणे टाळावे असे सांगितले जाते. याशिवाय नदीजवळ कधीच केस मोकळे सोडू नये. कारण या ठिकाणीही नकारात्मक ऊर्जा अधिक सक्रिय असतात.
स्मशानभूमी किंवा त्याच्या आजूबाजूला महिलांनी कधीच केस मोकळे सोडू नये. या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा अधिक असतात.
बहुतांशवेळा रात्रीचा प्रवास करताना आपल्यासमोर लख्ख काळोख आणि अज्ञात रस्ते असतात. पण काळोखाच्या ठिकाणी महिलांनी कधीच केस मोकळे सोडू नये असे सांगितले जाते.
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.