मोजे न घालता फक्त शूज घातल्याने पायांचा घाम साचून बॅक्टेरिया वाढतात. त्यामुळे पायांना दुर्गंधी येते.
पायांच्या ओलसरपणामुळे बुरशी वाढते. यामुळे अॅथलीट फूट सारखे संसर्गजन्य आजार होतात. याशिवाय खाज सुटते, फोड येतात.
मोजे न घालता शूज घातल्याने टाच आणि पायांच्या बोटांना फोड येतात.
घाम शूजवर पडल्याने त्यांचे आतील भाग लवकर खराब होतात. त्यामुळे त्यांचे आयुष्य कमी होते.
ओलसरपणा आणि घर्षणामुळे त्वचा घट्ट होऊन काळी पडते. कालांतराने यामुळे वेदनाही होतात.
मोजे घामापासून, धुळीपासून पायांचे संरक्षण करतात. मोजे घातले नाहीत तर पाय घाण होतात आणि बॅक्टेरिया जमा होतात.
मधुमेहींना पायांना जखमा, फोड असतात. अशांनी कधीही मोजे न घालता शूज घालू नयेत.
दुधापेक्षा जास्त कॅल्शियम असलेले ८ पदार्थ
भिजवलेले अक्रोड खाण्याचे फायदे
वजन टाळण्यासाठी रात्री किती वाजता जेवण करायला हवं?
वाढलेलं वजन वंध्यत्वाचा प्रश्न निर्माण करते का?