Lifestyle

प्रेमानंद महाराजांनी सांगितले घरात मुलगी असण्याचे महत्त्व, जाणून घ्या

Image credits: facebook

भक्ताने विचारला प्रश्न

वृंदावनातले प्रेमानंद महाराज यांना एका भक्ताने त्याच्या दोन मुलींबद्दल विचारले. भक्ताने म्हटले की, दोन मुली असून लोक म्हणतात एक मुलगा असावा. यावर काय सांगाल...

Image credits: facebook

गुरुजींनी सांगितले स्री चे महत्त्व

प्रेमानंद महाराजांनी म्हटले की, तुमच्याकडे खूप पैसा, घर अथवा व्यवसाय असो पण घरात आई-बहीण अथवा मुलगी नसल्यास तेथे आनंद नसतो.

Image credits: facebook

महिलांचा सन्मान

लहान घर असले तरीही त्यामध्ये आई, बहीण अथवा मुलगी असल्यास ते स्वर्गासमान वाटते. यामुळेच महिलांना गृहलक्ष्मी म्हटले जाते.

Image credits: facebook

मुलांमध्ये अंतर करु नये

प्रेमानंद महाराज म्हणतात की, सध्या मुलगा अथवा मुलीमध्ये अंतर करु नये. आजकालचे मुलं वृद्ध आई-वडिलांना घरातून काढतात. पण याच स्थितीत मुलगी नेहमीच पालकांना आधार देते.

Image credits: facebook

मुलीला असते आई-वडिलांची ओढ

प्रेमानंद महाराज म्हणतात आजकालच्या बहुतांश प्रकरणात मुलीच आपल्या आई-वडिलांना आयुष्यभर सांभाळण्याचा विचार करतात.

Image credits: facebook