Lifestyle
आयुष्यात या व्यक्तींना कधीच पैसे उधार देऊ नका
महात्मा विदुर महाभारतातील प्रमुख पात्रांपैकी एक आहेत. विदुर हे राजा धृतराष्ट्र यांचा भाऊ आणि हस्तिनापुरचे महामंत्री होते.
महात्मा विदुर यांनी आपल्या विदुर नीतिमध्ये अशा कोणत्या व्यक्तींना पैसे देऊ नये याबद्दल सांगितले आहे. जाणून घेऊया याबद्दल अधिक....
आळशी स्वभावाच्या व्यक्तीला कधीच पैसे उधार देऊ नये. या स्वभावाच्या व्यक्ती कामाचा कंटाळा करतात. याशिवाय दुसऱ्यांना मुर्ख बनवून त्यांच्याकडून पैसे घेतात.
लोभी स्वभाव असलेल्या व्यक्तीला कधीच पैसे उधारीवर देऊ नये. कारण लोभी व्यक्ती कधीच पैसे परत करत नाहीत.
जी व्यक्ती नेहमीच दुसऱ्यांचा विश्वास मोडते किंवा पैशांची उधारी कधीच परत करत नाही अशा व्यक्तींना तुम्ही पैसे देऊ नका.
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.