हिंदू धर्मामध्ये नवरात्रीचे विशेष महत्व आहे. वर्षातून दोनदा नवरात्री साजरी केली जाते. अशातच नवरात्रीवेळी कन्यांना भोजन दिले जाते. याचे महत्व काय जाणून घेऊया.
कुमारी मुलींना देवीचे रुप मानले जाते. अशातच मुलींना नवरात्रीच्या दिवसात भोजनासाठी बोलावले जाते. यावेळी भेटवस्तू दिल्याने देवीचे आशीर्वाद मिळतात असे मानले जाते.
घरात सुख-समृद्धी टिकून राहण्यासाठी नवरात्रीमध्ये कन्यांना भोजन द्यावे. यामुळे देवी प्रसन्न होते.
नवरात्रीचे व्रत करत असाल तर कन्यांना भोजन देणे अनिवार्य आहे. नवरात्रीवेळी कन्यांना भोजन दिल्यानंतर व्रत सोडू शकता.
एकदा इंद्रदेवांनी माता दुर्गेला प्रसन्न करण्यासाठी ब्रम्हांना विचारले होते. यावेळी नवरात्रीत उपवास करण्यासह देवीची पूजा आणि कन्यांना भोजन करण्याचे इंद्रदेवांना सांगितले होते.
नवरात्रीमध्ये कन्यांच्या भोजनासाठी शुद्ध आणि सात्विक जेवण तयार करावे.
सर्वप्रथम 9 कन्या आणि एका मुलाला घरी बोलवा. यांचे हातपाय धुवून घ्या आणि त्या सर्वांना भोजन द्या.
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.