Lifestyle

मान्सूनमध्ये भारतातील या 5 ठिकाणी चुकूनही जाऊ नका, धोक्यात पडाल

Image credits: freepik

केदारनाथ

मे महिन्यानंतर झालेल्या बर्फवृष्टीनंतर केदारनाथ मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले केले जातात. पण केदारनाथला पावसाळ्यात चुकूनही जाऊ नका. येथे मोठ्या प्रमाणात भूत्सखलन होते. 

Image credits: @Social Media Viral

मेघालय

मेघालय फिरण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन असले तरीही येथे मॉन्सूनमध्ये जाणे टाळा. मेघालयातील चेरापूंजी आणि मौसिनराम येथे दरवर्षी खूप पाऊस पडतो

Image credits: Facebook

स्पिती व्हॅली

मॉन्सूनमध्ये चुकूनही स्पिती व्हॅलीला भेट देऊ नका. येथे भूत्सखलन होण्याचा मोठा धोका निर्माण होत असल्याने अशा ठिकाणी जाणे टाळा.

Image credits: Facebook

उत्तराखंड

दिल्ली ते उत्तराखंडचा प्रवास अगदी कमी वेळाचा आहे. पण पावसाळ्यात उत्तराखंडला जाणे टाळा. येथे मॉन्सूनमध्ये जोरदार पाऊस पडत असल्याने रस्ते निसरडे होण्यासह भूत्सखलन होते. 

Image credits: Social Media

केरळ

पावसाळ्यात केरळ हिरवेगार झाल्याचे दिसते. पण केरळातील मुसळधार पावसामुळे कधीकधी पुराची स्थितीही निर्माण होते. अशातच केरळात जायचे असल्यास सप्टेंबर ते मार्च महिन्यात जाणे बेस्ट आहे.

Image credits: Facebook

चेन्नई

तमिळनाडूतील चेन्नईत मुसळधार पाऊस कोसळतो. येथे पुर येण्याची स्थितीही निर्माण होते.

Image credits: Instagram

दार्जिलिंग

‘क्विन ऑफ हिल्स’ नावाने प्रसिद्ध असणाऱ्या दार्जिलिंगमध्ये पर्यटकांची फार गर्दी होत असते. पण मॉन्सूनमध्ये दार्जिलिंगला जाण्याचे टाळा. येथे पावसाळ्यात घराबाहेर पडणेही मुश्किल होते.

Image credits: Facebook

आसाम

आसाममध्ये मान्सूनच्या काळात मुसळधार पाऊस पडतो. यामुळे आसाममध्ये पुर येणे, भूत्सखलन होणे अशी स्थिती निर्माण होण्याची शक्यता वाढली जाते.

Image credits: Instagram