शेतकरी लढणार आरपारची लढाई
Marathi

शेतकरी लढणार आरपारची लढाई

आंदोलनाचा आज 9 वा दिवस आहे. शेतकरी आणि सरकारच्या बैठकीतून काहीच निष्पन्न झाले नाही. दिल्लीकडे निघालेल्या शेतकऱ्यांनी आरपारच्या लढाईला सुरुवात केली असून ते मागे फिरायला तयार नाहीत  

1200 ट्रॅक्टर-ट्रॉली घेऊन दिल्लीत कूच करणार शेतकरी
Marathi

1200 ट्रॅक्टर-ट्रॉली घेऊन दिल्लीत कूच करणार शेतकरी

शेतकरी बाराशे ट्रॅक्टर-ट्रॉली घेऊन दिल्लीकडे निघाले आहेत. पंजाबमधील चौदा हजार शेतकरी शंभू बॉर्डरवरून देशाच्या राजधानीच्या दिशेने निघाले आहेत.

Image credits: social media
खनौरी बॉर्डरवर परिस्थिती अवघड
Marathi

खनौरी बॉर्डरवर परिस्थिती अवघड

परिस्थिती हाताबाहेर चालली आहे. कारण खनौरी बॉर्डरवरून शेतकरी हरियाणामध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्यासोबत 800 ट्रॅक्टर आहेत.

Image credits: social media
शंभू बॉर्डरवर तणावपूर्ण वातावरण
Marathi

शंभू बॉर्डरवर तणावपूर्ण वातावरण

हरियाणा बॉर्डरवर शेतकऱ्यांना थांबवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा मारा चालू केला आहे. शंभू बॉर्डरवरील वातावरणही तणावपूर्ण झाले आहे.

Image credits: social media
Marathi

शेतकऱ्यांनी अश्रुधुरापासून वाचण्यासाठी मास्कचा केला वापर

शेतकऱ्यांनी अश्रुधुरापासून वाचण्यासाठी चेहऱ्यावर मास्क आणि इअर बड्स घातले आहेत. शेतकरी प्रत्येक संकटाशी लढण्यास तयार असल्याचे दिसून येत आहे.

Image credits: social media
Marathi

किसान आंदोलनात आतापर्यंत झालेत चौघांचा मृत्यू

आंदोलनात आतापर्यंत चार मृत्यू झाले आहेत. यामध्ये 2 शेतकरी आणि 2 पोलिसांचा समावेश आहे. केंद्रीय कृषी मंत्री अर्जुन मुंडा यांनी शेतकऱ्यांना बैठकीसाठी परत आमंत्रण दिले आहे.

Image credits: social media
Marathi

अग्निशमन दलाच्या 100 गाड्या तैनात

पोलिसांनी शेतकऱ्यांचा सामना करण्याची पूर्ण तयारी केली आहे. शंभरपेक्षा जास्त अग्निशमन दलाच्या गाड्या आणि हजारो पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

Image credits: social media

कोण आहेत स्वामी नारायण? UAE मधील मंदिरात केली जाते पूजा

Corporate Tax कमी झाल्याने असा होणार फायदा, जाणून घ्या अधिक

अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी देशात बदलणार हे नियम

स्वस्त होणार स्मार्टफोन, अर्थसंकल्पापूर्वी सरकारचे नागरिकांना गिफ्ट