पूर्वी, चेक जमा केल्यानंतर बँकेत दोन सलग कामकाजाचे दिवस थांबावे लागायचे. म्हणजे चेक दिल्यानंतर दोन दिवसांनीच पैसे खात्यात जमा व्हायचे आणि चेक क्लिअर होत असे. पण आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) हे नियम बदलले आहेत. ४ ऑक्टोबरपासून नवीन नियम लागू होतील. आता चेक क्लिअर होण्यासाठी दोन दिवस थांबण्याची गरज नाही, काही तासांतच पैसे खात्यात जमा होतील.