PM Kisan Mandhan Yojana : केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या वृद्धापकाळातील आर्थिक सुरक्षेसाठी 'प्रधानमंत्री किसान मानधन योजना' सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत, पात्र शेतकऱ्यांना वयाच्या 60 वर्षांनंतर दरमहा 3,000 रुपये पेन्शन मिळते.
मुंबई : शेतकऱ्यांचे आयुष्य बहुतेक कष्ट, अनिश्चित उत्पन्न आणि निसर्गावर अवलंबून असते. कामाच्या सक्रिय वयात रोज काबाडकष्ट करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांकडे वृद्धावस्थेत नियमित उत्पन्नाचा ठोस आधार नसतो. ही गरज लक्षात घेऊन केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी ‘प्रधानमंत्री किसान मानधन योजना (PM Kisan Mandhan Yojana)’ सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश वृद्धापकाळात शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा देणे आणि इतरांवर अवलंबून राहणे टाळणे आहे. योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वयाच्या 60 वर्षानंतर दरमहा 3,000 रुपये निश्चित पेन्शन मिळणार आहे.
27
योजना कोणासाठी?
प्रधानमंत्री किसान मानधन योजना ही लहान, अल्पभूधारक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकऱ्यांसाठी सुरु केलेली ऐच्छिक सामाजिक सुरक्षा योजना आहे. सामान्य नोकरी करणारे लोक पीएफ, विमा किंवा पेन्शन योजनांमधून निवृत्तीची तयारी करतात, परंतु शेतकऱ्यांकडे बहुतेकदा अशी व्यवस्था नसते. त्यामुळे वृद्धावस्थेत आर्थिक अडचणी टाळण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरते.
37
हप्त्याची रक्कम किती?
योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांचे वय 18 ते 40 वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे. नोंदणी झाल्यानंतर
दरमहा हप्ते: वयानुसार 55 रुपये ते 200 रुपये
सरकारची मॅचिंग रक्कम: शेतकऱ्याने भरलेली रक्कम केंद्र सरकारसुद्धा तितकीच जमा करते