१. विलंब टाळता येणार: नोटीस पाठवण्यासाठी लागणारे महिने आता काही सेकंदांत वाचणार आहेत.
२. पारदर्शकता वाढणार: ई-मेलचा डिजिटल पुरावा उपलब्ध असल्याने प्रक्रियेत पारदर्शकता येईल.
३. प्रलंबित प्रकरणांचा निपटारा: मंत्रालय स्तरावर प्रलंबित असलेली सुमारे १२ हजार प्रकरणे आता जलदगतीने निकाली निघतील.
४. टपाल खर्चात बचत: प्रशासकीय कामातील कागदपत्रे आणि टपाल खर्चात मोठी घट होऊन यंत्रणेवरील ताण कमी होईल.
५. सामान्य नागरिकांना दिलासा: तारखांवर तारखा पडण्याचे प्रमाण कमी झाल्याने सामान्य माणसाला वेळेत न्याय मिळेल.