मुंबई - मासिक पाळीचा काळ हा आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचा असतो. मासिक पाळीच्या काळात अनेक महिला काही सामान्य चुका करतात. या चुकांमुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात.
प्रत्येक महिन्याला महिलांना मासिक पाळी येते. या काळात त्यांना डोकेदुखी, शरीरात दुखणे, रक्तस्राव, झोपेची कमतरता अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या समस्यांमुळे त्यांच्या जीवनशैलीवर परिणाम होतो. याशिवाय, या काळात अनेक महिला काही सामान्य चुका करतात. या चुकांमुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. विशेषतः वापरले जाणारे पॅड्स, त्यांचा वापर आणि आहाराबाबत चुका करू नयेत. चला तर मग, पाहूयात त्या चुका कोणत्या....
25
१. रेयॉन, कॉटन पॅड्स....
मासिक पाळीच्या काळात जवळपास सर्वजण पॅड्स वापरतात. हे पॅड्स रेयॉन किंवा कॉटन मटेरियलपासून बनवलेली असतात. पण, त्यात धोकादायक रसायने आणि कीटकनाशके असतात. ही महिलांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम करतात. त्यात असलेले डायऑक्सिन जननेंद्रियाच्या ऊतींवर परिणाम करते. यामुळे इतर जननेंद्रियाच्या समस्याही सुरू होतात. हे टाळण्यासाठी, ऑरगॅनिक कॉटनपासून बनवलेले पॅड्स वापरणे चांगले.
35
पॅड जास्त वेळ न बदलणे...
बाजारात उपलब्ध असलेल्या पॅड्सबद्दल कंपन्या आकर्षक जाहिराती देतात. १२ तासांपर्यंत आमचे पॅड वापरू शकता, ८ तास वापरले तरी लीकेज होणार नाही असे दावे केले जातात. हे खरे मानून, अनेक महिला पॅड्स जास्त वेळ वापरतात. मात्र, यामुळे संसर्गाचा धोका वाढतो. त्यामुळे ही चूक करू नये. दर ४ ते ८ तासांनी पॅड्स किंवा टॅम्पून बदलले पाहिजेत. जर तुम्ही बाहेर जात असाल तर मेन्स्ट्रुअल कप वापरू शकता. ते १२ तासांपर्यंत वापरता येते.
परफ्यूमचा वापर..
मासिक पाळीच्या काळात रक्तस्राव होतो आणि त्यामुळे वास येतो या भीतीने अनेक महिला त्या भागावर परफ्यूम वापरतात. पण, ते वापरणे तुमच्या त्वचेसाठी चांगले नाही, कारण यामुळे यीस्ट इन्फेक्शन आणि इतर संसर्ग होऊ शकतात.
काही महिलांना मासिक पाळीच्या काळात तीव्र वेदना होतात. त्या कमी करण्यासाठी त्या वेदनाशामक गोळ्या घेतात. या काळात वेदनाशामक गोळ्या घेणे धोकादायक असू शकते. त्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. याशिवाय, या गोळ्या अल्सर, मूत्रपिंड, यकृत आणि आतड्यांच्या समस्या निर्माण करू शकतात. यामुळे शरीरातील चांगले बॅक्टेरियाही नष्ट होतात. हे टाळण्यासाठी, गोळ्यांपेक्षा नैसर्गिक उपाय करणे चांगले.
55
व्यायाम न करणे
मासिक पाळीच्या काळात महिला आपली दिनचर्या बदलतात. विशेषतः त्या व्यायाम करणे टाळतात. पण, या काळात व्यायाम करणे खूप महत्वाचे आहे कारण त्यामुळे चांगली झोप येते. घामाद्वारे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात.