Irfan Pathan: 'आज संडे है क्या?'; महिला टीमने पाकिस्तानला धूळ चारताच पठाणने घेतली फिरकी

vivek panmand   | CMS
Published : Sep 06, 2026, 05:40 PM IST
Irfan Pathan: 'आज संडे है क्या?'; महिला टीमने पाकिस्तानला धूळ चारताच पठाणने घेतली फिरकी

सार

महिला आशिया कप क्रिकेट स्पर्धेत भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ७ विकेट्सनी धुव्वा उडवला आहे. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे पाकिस्तानचा संघ अवघ्या ५५ धावांवर गारद झाला. या दणदणीत विजयासह भारताने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे.

क्रिकेटच्या मैदानात पाकिस्तानविरुद्ध भारताचा दबदबा कायम आहे. रविवारी झालेल्या महिला आशिया कप सामन्यात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला ७ विकेट्सनी धूळ चारली.

पाकिस्तानचा संघ अवघ्या ५५ धावांत गारद!

टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा पाकिस्तानचा निर्णय त्यांच्यावरच उलटला. भारतीय फिरकी गोलंदाजांपुढे पाकिस्तानच्या बॅटर्सनी अक्षरशः गुडघे टेकले. भारताकडून श्री चरणी आणि प्रेमा रावत यांनी शानदार गोलंदाजी करत प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. त्यांच्या भेदक माऱ्यामुळे पाकिस्तानचा संपूर्ण संघ अवघ्या ५५ धावांवर ऑलआऊट झाला.

भारताने सहज गाठलं लक्ष्य

या सोप्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने फक्त ८.४ ओव्हर्समध्ये ३ विकेट्स गमावून विजय मिळवला. कर्णधार हरमनप्रीत कौर (१८*) आणि दीप्ती शर्मा (१२*) यांनी नाबाद राहत संघाला विजयापर्यंत पोहोचवलं. या विजयासह भारताने ग्रुप स्टेजमधील तिन्ही सामने जिंकून एकूण ६ गुणांसह सेमीफायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे.

पठाणची 'संडे'वाली खोचक पोस्ट!

भारताच्या या शानदार विजयानंतर, माजी ऑलराऊंडर इरफान पठाणने सोशल मीडिया 'X' वर एक पोस्ट करत पाकिस्तानची फिरकी घेतली. त्याने 'आज संडे है क्या?' (आज रविवार आहे का?) असं विचारत पाकिस्तानला डिवचलं आहे.

याआधी २०२५ च्या पुरुष आशिया कपमध्ये सलग तीन रविवारी भारत आणि पाकिस्तानचे सामने झाले होते. त्यावेळी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारताने पाकिस्तानला हरवल्यावर पठाणने, 'संडे कैसा रहा पडोसियों?' (शेजाऱ्यांनो, रविवार कसा होता?) असं विचारलं होतं. आता त्याच स्टाईलमध्ये त्याने महिला संघाच्या विजयाचा आनंद साजरा केला आहे.

कर्णधार हरमनप्रीत विजयाने खुश

सामन्यानंतर बोलताना कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली, "हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा सामना होता. संघाच्या कामगिरीवर मी खूप खूश आहे. आमच्या गोलंदाजांनी पिचचा योग्य अंदाज घेऊन प्लॅननुसार गोलंदाजी केली. मैदानावर आम्ही दाखवलेल्या शिस्तीमुळेच हा विजय शक्य झाला."

भारताकडून पराभूत झाल्यामुळे पाकिस्तान संघाला आता सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी हाँगकाँगविरुद्धचा शेवटचा सामना जिंकणं अत्यंत महत्त्वाचं आहे. या सामन्यात पाकिस्तानवर विजय मिळवण्याचं मोठं दडपण असणार आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Duleep Trophy : वैभव सूर्यवंशीची वादळी खेळी, पण अर्धशतक हुकलं; ईश्वरनचं शानदार अर्धशतक
Harmanpreet Kaur: हरमनप्रीत कौरचा वर्ल्ड रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारी ठरली पहिलीच क्रिकेटर!