वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करून इतिहास रचणारा बिहारचा वैभव सूर्यवंशी पहिल्या तीन T20 सामन्यांमध्ये स्वस्तात बाद झाला आहे. त्यामुळे त्याने सर्वांची निराशा केली आहे.
वैभव सूर्यवंशीने जर येत्या सामन्यांमध्ये आपल्या चुका सुधारल्या नाहीत, तर तो संघातून बाहेर होऊ शकतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, वैभवने हे लक्षात ठेवायला हवं की ही आयपीएल नाही, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट आहे. त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अपेक्षित सुरुवात मिळालेली नाही.
26
पहिल्या 3 सामन्यांमध्ये वैभवने केल्या फक्त 42 धावा
टीम इंडियाकडून खेळताना वैभव सूर्यवंशीने अनुक्रमे १४, १३ आणि १५ धावा करून विकेट गमावली. पहिल्या तीन सामन्यांत तो फक्त ४२ धावा करू शकला. वैभवने काही चौकार-षटकार मारले, पण तो मोठी खेळी करू शकला नाही. इंग्लंडमध्ये त्याला आयपीएलमधली जादू दाखवता आली नाही. मिळालेल्या संधीचं सोनं करण्यात तो वारंवार अपयशी ठरत आहे. वैभवला खालील चुकांमधून शिकावंच लागेल.
36
१. परिस्थितीनुसार खेळण्यात अपयशी
अनेक क्रिकेट विश्लेषकांच्या मते, वैभव सूर्यवंशी परिस्थितीनुसार खेळत नाहीये. ज्या वातावरणात खेळण्याचा अनुभव कमी असतो, तिथे सुरुवातीला काही चेंडू खेळून खेळपट्टीचा अंदाज घ्यावा लागतो आणि मग आक्रमक खेळ करावा लागतो. नाहीतर वैभव जास्त वेळ क्रीझवर टिकू शकणार नाही. ही चूक त्याला सुधारावी लागेल.
इंग्लंडचे वेगवान गोलंदाज वैभवला सतत शॉर्ट बॉल टाकून अडचणीत आणत आहेत. वैभवला असे चेंडू अधिक सावधगिरीने खेळावे लागतील. जोफ्रा आर्चरने तर बाऊन्सर टाकून दोनदा वैभवला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे. त्यामुळे शॉर्ट बॉल खेळताना वैभवला अधिक सतर्क राहावं लागेल.
56
३. अनावश्यक आक्रमकपणा टाळायला हवा
वैभव सूर्यवंशी आयपीएलमध्ये पहिल्याच चेंडूपासून मोठे फटके मारायचा प्रयत्न करायचा. पण हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट आहे. इथे त्याला परिस्थितीनुसार आपल्या बॅटिंगच्या शैलीत बदल करावा लागेल. गरज नसताना आक्रमक खेळण्याऐवजी वैभवने सावध खेळ करण्यावर लक्ष केंद्रित करायला हवं.
66
संधीसाठी अनेक खेळाडू रांगेत आहेत
टीम इंडियामध्ये सलामीवीर म्हणून खेळण्यासाठी शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांसारखे खेळाडू आधीच स्पर्धेत आहेत. या सगळ्यांमध्ये जर वैभवने आपल्या चुका सुधारल्या नाहीत, तर त्याचं संघातील स्थान धोक्यात येऊ शकतं आणि तो बाहेर फेकला जाऊ शकतो.