
मुंबई: सध्याच्या घडीला राजकारणात कधी काय घडेल सांगता येत नाही. मुंबईतील दादर येथे असलेल्या कबुतरखान्याचा प्रश्न अडकला होता. त्या कबुतरांमुळे आजार होत होते असं अनेकजण म्हणत होते. त्यातच नंतर कबुतरखाना बंद केल्यामुळं जैन धर्मियांनी आंदोलन केलं होत. आता आमदार राम कदम यांनी या कबुतरखान्यावरून आपलं मत मांडलं आहे.
राम कदम यांनी यावेळी बोलताना आपलं मत व्यक्त केलं आहे. राम कदम बोलले की, ज्या आईने मला जन्म दिला तिचे १२ जून रोजी निधन झाले. माझ्या आईच्या बाबतीत शेवटच्या क्षणी जे झालं ते कोणाच्या बाबतीत होऊ नये. माझ्या आईने आयुष्यभर नामस्मरण केलं. तिला तिच्या शेवटच्या क्षणी मरण यातना सहन कराव्या लागल्या.
माझ्या आईला फुफ्फुसाचा आजार झाला होता. या आजाराला संपूर्ण जगात कोणतही औषध नाही. हा आजार झालेल्या रुग्णाला २४ तास ऑक्सिजन लागतो. पण हा आजरा वाढत गेल्यानंतर फुफ्फुसात वेदना होत होत्या. माझी आई पंधरा मिनिटे सलग खोकत होती. खोकता खोकता ती बेशुद्ध व्हायची. भारतात दर वर्षी नऊ लाख रुग्ण या आजाराला बळी पडतात.