
Mumbai Monsoon Update : जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच मॉन्सूनची प्रतीक्षा करणाऱ्या मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. गेल्या तीन आठवड्यांची वाट पाहायला लावल्यानंतर मुंबईत हलक्या ते मध्यम स्वरुपात पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली आहे. आजपासून (23 जून) मॉन्सून सक्रीय होण्याची दाट शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. याशिवाय शहरात यलो अॅलर्ट जारी केला आहे. पुढील 48 तासांत राज्यातील काही भागात नैऋत मोसमी वाऱ्यांचा वेग वाढण्याची शक्यता असल्याचे IMD ने म्हटले आहे.
मुंबई आणि परिसरात 24 जूनपर्यंत यलो अलर्ट कायम राहणार आहे. आठवड्याच्या अखेरीस झालेल्या हलक्या पावसानंतर आता पुढील काही दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तसेच महाराष्ट्रासह तेलंगणा, ओडिशा, छत्तीसगड, झारखंड आणि बिहारमधील काही भागांत मॉन्सून पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.
मौसम संबंधी चेतावनी
मुख्य बिंदु
(i) अगले 48 घंटों के दौरान दक्षिण-पश्चिम मॉनसून के महाराष्ट्र (मुंबई सहित), तेलंगाना और ओडिशा के बाकी हिस्सों, और छत्तीसगढ़, झारखंड और बिहार के कुछ और इलाकों में आगे बढ़ने के लिए परिस्थितियाँ अनुकूल हैं।
(ii) पूर्वोत्तर भारत और उप-हिमालयी पश्चिम… pic.twitter.com/8evtyroxCP— India Meteorological Department (@Indiametdept) June 22, 2026
स्कायमेटच्या (Skymet) अंदाजानुसार, यंदा मुंबईत मॉन्सूचने आगमन उशिराने झाले. पण आता पावसासाठी सकारात्मक हवामान तयार होत आहे. यामुळे आजपासून मुंबईतील पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय कोकण, गोवा आणि पश्चिम किनारपट्टीवरही पावसाचा जोर वाढलेला दिसणार आहे.
After a long wait today could be the day Mumbai may see its first widespread heavy rainfall event, typically associated with monsoon onset, as monsoon shows visible signs of strengthening. Meanwhile as monsoon picks up thunderstorms over interior areas are expected to gradually… pic.twitter.com/8EnV4TGIQg
— Chennai Rains (COMK) (@ChennaiRains) June 22, 2026
हवामान खात्यानुसार, सुरुवातीला हलका ते मध्यम स्वरुपात पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज आहे. यानंतर पुढील काही दिवसांत मॉन्सूनसाठी पोषक असे वातावरण तयार झाल्यानंतर पावसाचा जोर वाढलेला दिसून येईल.
23 जूननंतर कोकण पट्टा, गोवा आणि पश्चिम किनारपट्टीवरील अनेक भागांमध्ये पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. अशातच आता उकाड्याने हैराण झालेल्या मॉन्सूनच्या आगमनाने मुंबईकरांना थोडासा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.