वाहतूक कोंडीतून सुटका: दहिसर चेकनाक्यावरील भीषण ट्रॅफिकमधून मिरा-भाईंदरकरांची सुटका होईल.
वेळेची बचत: रस्ते मार्गाने लागणाऱ्या वेळेच्या तुलनेत मेट्रोने प्रवास केल्यास ३० ते ४० मिनिटांची बचत होईल.
आरामदायी प्रवास: पश्चिम उपनगरांना जोडणारी ही महत्त्वाची लिंक ठरल्यामुळे नोकरदार वर्गाला मोठा दिलासा मिळेल.
६ एप्रिलपासून मिरा-भाईंदरचे नागरिक खऱ्या अर्थाने 'मेट्रो लाईफ'चा अनुभव घेऊ शकणार आहेत. सुरक्षेच्या खात्रीनंतर सुरू होणारी ही सेवा शहराच्या विकासाला नवी गती देईल.