राज्य सरकारच्या मार्गदर्शनाखाली हे धोरण राबवण्यात येणार असून, भाड्याच्या घरांसाठी स्वतंत्र ऑनलाइन पोर्टल सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पोर्टलच्या माध्यमातून इच्छुक नागरिकांना थेट म्हाडाची भाड्याची घरे अर्ज करून मिळू शकणार आहेत.
मुंबई, ठाणे, नवी मुंबईसारख्या भागात घर खरेदी करणे परवडत नसलेल्या नोकरदार, विद्यार्थी, स्थलांतरित आणि गरजू नागरिकांसाठी हा निर्णय अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.