केवळ नवीन गाड्याच नाही, तर रेल्वे पायाभूत सुविधांमध्येही आमूलाग्र बदल करणार आहे. रेल्वेमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०३० पर्यंत गाड्या चालवण्याची क्षमता दुप्पट करण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी खालील कामे वेगाने पूर्ण केली जातील.
नवीन प्लॅटफॉर्म आणि टर्मिनल्स: मुख्य स्थानकांवर कोचिंग टर्मिनल्सचा विस्तार.
सिग्नलिंग आणि ट्रॅकिंग: सिग्नल यंत्रणेचे आधुनिकीकरण आणि मल्टीट्रॅकिंगवर भर.
५ वी आणि ६ वी मार्गिका: परळ ते कुर्ला दरम्यान ५ व्या आणि ६ व्या मार्गिकेचे काम पूर्ण करणे.
कल्याण-कसारा पट्टा: या मार्गावर तिसरी आणि चौथी मार्गिका अपग्रेड केली जाणार असून, यामुळे कसारा प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल.