कल्याण-डोंबिवलीकरांना रेल्वेचं न्यू इयर गिफ्ट! पुढच्या ५ वर्षांत धावणार ५४८ नव्या लोकल; गर्दीच्या त्रासातून सुटका?

Published : Dec 28, 2025, 07:03 PM IST

Mumbai Local : मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल प्रवाशांसाठी रेल्वेने एक बंपर प्लॅन तयार केला. येत्या ५ वर्षांत मध्य, पश्चिम रेल्वेवर ७०० हून अधिक नवीन लोकल फेऱ्या सुरू होणार असून, विशेषतः कल्याण-डोंबिवली पट्ट्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

PREV
15
कल्याण-डोंबिवलीकरांना रेल्वेचं न्यू इयर गिफ्ट!

मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल प्रवासाचा अनुभव आता बदलणार आहे. विशेषतः कल्याण आणि डोंबिवली पट्ट्यातील प्रवाशांसाठी रेल्वेने 'बंपर प्लॅन' तयार केला आहे. येत्या ५ वर्षांत मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मिळून ७०० हून अधिक नवीन लोकल फेऱ्या सुरू होणार असून, यामध्ये एकट्या मध्य रेल्वेच्या वाट्याला ५४८ फेऱ्या येणार आहेत. 

25
गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी रेल्वेचा 'मास्टर प्लॅन'

दिवसेंदिवस वाढणारी प्रवाशांची संख्या आणि लोकलमध्ये होणारी जीवघेणी गर्दी लक्षात घेऊन रेल्वे मंत्रालयाने कंबर कसली आहे. शनिवारी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने या सेवा सुरू केल्या जातील.

मध्य रेल्वे: ५४८ नवीन लोकल सेवा.

पश्चिम रेल्वे: १६५ नवीन लोकल सेवा. 

35
२०३० पर्यंत रेल्वेची क्षमता होणार दुप्पट!

केवळ नवीन गाड्याच नाही, तर रेल्वे पायाभूत सुविधांमध्येही आमूलाग्र बदल करणार आहे. रेल्वेमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०३० पर्यंत गाड्या चालवण्याची क्षमता दुप्पट करण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी खालील कामे वेगाने पूर्ण केली जातील.

नवीन प्लॅटफॉर्म आणि टर्मिनल्स: मुख्य स्थानकांवर कोचिंग टर्मिनल्सचा विस्तार.

सिग्नलिंग आणि ट्रॅकिंग: सिग्नल यंत्रणेचे आधुनिकीकरण आणि मल्टीट्रॅकिंगवर भर.

५ वी आणि ६ वी मार्गिका: परळ ते कुर्ला दरम्यान ५ व्या आणि ६ व्या मार्गिकेचे काम पूर्ण करणे.

कल्याण-कसारा पट्टा: या मार्गावर तिसरी आणि चौथी मार्गिका अपग्रेड केली जाणार असून, यामुळे कसारा प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. 

45
पश्चिम रेल्वेवर एसी लोकलचा सुळसुळाट

पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी विनित अभिषेक यांनी सांगितले की, बोरिवलीपर्यंत सहाव्या मार्गिकेचे काम पूर्ण होताच तातडीने २० नवीन सेवा सुरू होतील. तसेच, प्रवाशांची वाढती मागणी पाहता भविष्यात आणखी नवीन एसी लोकल (AC Local) गाड्या ताफ्यात सामील केल्या जाणार आहेत. सध्या पश्चिम रेल्वेवर दररोज १,४०६ फेऱ्या चालवल्या जातात, ज्यात मोठी वाढ होणार आहे.

55
प्रवाशांना काय फायदा होणार?

१. वेळेची बचत: फेऱ्या वाढल्यामुळे गाड्यांमधील अंतर कमी होईल.

२. सुखकर प्रवास: नवीन एसी लोकलमुळे प्रवासाचा दर्जा सुधारेल.

३. कनेक्टिव्हिटी: उपनगरातून मुख्य शहरात पोहोचणे अधिक सोपे होईल.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories