मुंबई : राज्यातील हवामानाने सध्या नागरिकांची चांगलीच परीक्षा पाहायला सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांत ढगाळ वातावरण, सकाळचे धुके आणि दुपारनंतर जाणवणारी उष्णता असे संमिश्र चित्र पाहायला मिळत आहे. तापमानात झालेल्या वाढीमुळे थंडीचा जोर ओसरला असून, अनेक भागांत किमान तापमान 10 अंश सेल्सिअसच्या वर नोंदवले जात आहे.
दरम्यान, हवामान विभागाच्या अंदाजानुसार प्रजासत्ताक दिनी म्हणजेच 26 जानेवारी रोजी राज्याच्या काही भागांत पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनात हवामानाबाबत उत्सुकता वाढली आहे. तर पाहूया, राज्यातील विविध भागांमध्ये हवामान कसे राहणार आहे.