Maharashtra Weather Alert : महाराष्ट्राच्या हवामानात बदल, 9 जिल्ह्यांना 'यलो अलर्ट'; तुमच्या जिल्ह्यात पाऊस पडणार का?

Published : Jul 28, 2025, 10:19 PM ISTUpdated : Jul 28, 2025, 10:35 PM IST
MP Weather Alert

सार

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. रत्नागिरी, रायगड, पुणे, सातारा, नागपूर, अमरावती, वर्धा, भंडारा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Maharashtra Weather Alert : राज्यात पावसाचे वातावरण आता हळूहळू निवळत चालले असले तरी काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अजूनही कायम आहे. 29 जुलै 2025 रोजीच्या हवामान अंदाजानुसार, महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

मुंबई व उपनगर: ढगाळ वातावरण, पण अलर्ट नाही

मुंबई आणि परिसरात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हलक्या सरी कोसळतील, मात्र हवामान विभागाने मुंबई, ठाणे आणि उपनगरांसाठी कुठलाही अलर्ट जारी केलेला नाही. जनजीवन सुरळीत राहण्याची शक्यता आहे.

कोकणात रत्नागिरी-रायगडसाठी यलो अलर्ट

रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

पुढील 24 तासांसाठी यलो अलर्ट जाहीर.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा फारसा जोर दिसणार नाही, त्यामुळे अलर्ट नाही.

पश्चिम महाराष्ट्र: पुणे-साताऱ्यात काळजीची गरज

पुणे आणि सातारा घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे.

इतर जिल्हे जसे की सांगली, कोल्हापूर, सोलापूर येथे हलक्या सरींशिवाय उघडीप राहणार आहे.

उत्तर महाराष्ट्रात पावसाची विश्रांती

धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये मोठा पाऊस होण्याची शक्यता नाही.

या भागात श्रावणातील सौम्य सरी अनुभवायला मिळतील, परंतु मुसळधार पावसाचा धोका नाही.

मराठवाड्यात उघडीप, तुरळक पाऊस शक्य

छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यांमध्ये क्वचित ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.

सध्या या भागात कोणताही पावसाचा अलर्ट दिलेला नाही.

विदर्भात मात्र पावसाचा जोर कायम!

नागपूर, अमरावती, वर्धा, भंडारा, चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.

काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा असल्याने नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक.

राज्यात बहुतांश ठिकाणी हवामान निवळले असले, तरी 9 जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर संभवतो. त्यामुळे संबंधित भागातील नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचं पालन करावं आणि आवश्यक ती सावधगिरी बाळगावी.

 

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

अपघाताची बातमी वाचून डोळ्यापुढं येतील अंधाऱ्या, गोंदियातील अपघातात तिघांचा जागीच मृत्यू; ४० पेक्षा जास्त प्रवासी जखमी
Indigo Update : आजही शुक्रवारी शेकडो उड्डाणे रद्द, मुंबई-पुणे-नागपूरसह प्रमुख विमानतळांवर गोंधळ