कडाक्याच्या थंडीत सौर पंप बंद पडला? टेन्शन नका घेऊ! तक्रार कुठे आणि कशी करायची?, जाणून घ्या एका क्लिकवर

Published : Nov 18, 2025, 04:30 PM IST

Solar Krushi Pump Complaint Process: राज्यात हिवाळ्यात सौर कृषी पंप बंद पडल्यास तक्रार कुठे करावी, यावर महावितरणने उपाय आणला. महावितरणच्या मोबाईल अॅपमध्ये 'सौर पंप तक्रार' हा नवीन पर्याय जोडण्यात आला, ज्यामुळे शेतकरी मोबाईलवरून तक्रार नोंदवू शकतात. 

PREV
16
हिवाळ्यात सौर कृषी पंप बंद पडलाय?, हे काम नक्की करा

Agriculture News: राज्यात थंडीचा जोर वाढत असून या हंगामात सौर कृषी पंप बंद पडणे, बॅटरी निकामी होणे किंवा पॅनेलमध्ये बिघाड येणे सामान्य आहे. मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत लाखो शेतकऱ्यांना पंप देण्यात आले असले तरी, बिघाड झाल्यास तक्रार कुठे करावी याबाबत शेतकरी अडचणीत होते. आता ही समस्या सोडवण्यासाठी महावितरणने विशेष मोबाईल अॅपमध्ये नवा पर्याय ‘सौर पंप तक्रार’ जोडला आहे, ज्यामुळे तक्रार करणे अतिशय सोपे झाले आहे. 

26
राज्यात 5.65 लाखांहून अधिक सौर पंप, तक्रारींची सोपी व्यवस्था

राज्यात आतापर्यंत 5,65,000 पेक्षा जास्त सौर कृषी पंप बसवण्यात आले आहेत. पंपात बिघाड, चोरी किंवा तांत्रिक समस्या आल्यास त्वरित तक्रार नोंदवणे आवश्यक आहे.

पूर्वी तक्रार करण्यासाठी शेतकऱ्यांकडे तीन पर्याय होते

महावितरणची अधिकृत वेबसाइट

पुरवठादार कंपनीची वेबसाइट

महावितरणचा टोल-फ्री नंबर

आता या सर्वांवर मात करत मोबाईल अॅपद्वारे सेकंदात तक्रार नोंदवण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. 

36
महावितरण अॅपमधील नवी सुविधा, सौर पंप तक्रार

महावितरणचे मोबाईल अॅप आधीच वीज बिल पाहणे, बिल भरणे, मीटर रीडिंग, वीज चोरीची माहिती देणे, खराब ट्रान्सफॉर्मरची तक्रार अशा सुविधांमुळे लोकप्रिय आहे. आता यामध्ये सौर कृषी पंप तक्रार हा नवा पर्याय जोडण्यात आल्याने शेतकरी थेट मोबाईलवरून तक्रार नोंदवू शकतात. 

46
तक्रार कशी करायची?

अॅपमध्ये ‘सौर पंप तक्रार’ विभाग उघडा

तुमचा लाभार्थी क्रमांक किंवा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाका

पंपातील बिघाड किंवा समस्या स्पष्टपणे नमूद करा

तक्रार सबमिट करा 

56
कोणत्या प्रकारच्या तक्रारी करता येतील?

शेतकरी खालील समस्या सहज नोंदवू शकतात

पंप सुरू न होणे

सौर पॅनेल तुटणे/नुकसान

बॅटरी किंवा ऊर्जा संच काम न करणे

पॅनेल किंवा पंप चोरी

पंपातून पाण्याचा दाब घटणे

महत्त्वाची गोष्ट म्हणजे सौर पंप संचावर विमा आहे, त्यामुळे चोरीसारख्या घटनांमध्येही संरक्षण मिळते. तसेच, पंप बसवल्यानंतर पहिले 5 वर्षे देखभाल व दुरुस्तीची संपूर्ण जबाबदारी पुरवठादार कंपनीची असते. 

66
तक्रारीवर 3 दिवसांत तोडगा

तक्रार नोंदवल्यानंतर 3 दिवसांच्या आत समस्या सोडवणे बंधनकारक आहे. शेतकऱ्यांचा पिकांचा हंगाम बिघडू नये आणि पाणीपुरवठा खंडित होऊ नये, हा सरकारचा उद्देश आहे.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories