आयुष्मान कार्ड काढण्यासाठी रेशन कार्ड हा सर्वात महत्त्वाचा आधार मानला जातो. अनेक महा-ई-सेवा केंद्रांवर "रेशन मिळत असेल तरच कार्ड मिळेल" अशी भूमिका घेतली जात आहे.
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, तुमच्या रेशन कार्डवर १२ अंकी ऑनलाइन क्रमांक असणे आवश्यक आहे. जर हा क्रमांक नसेल, तर तांत्रिक अडचणींमुळे कार्ड बनवण्यास अडथळे येतात. ज्या रुग्णांना तातडीने उपचारांची गरज आहे, त्यांच्यासाठी तहसील कार्यालयातून हा १२ अंकी नंबर मिळवून महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ घेता येतो.